Story of Soragat in Marathi : कणकवली तालुक्यातल्या आळसवली गावातला तो एक अठ्ठावीस वर्षांचा, सळसळत्या रक्ताचा तरुण होता. त्याचं पाळण्यातलं नाव साबाजी. खरं तर हे त्याच्या आजोबांचं नाव, पण त्यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आत त्याचा जन्म झाल्यामुळे त्याच्या आजीला वाटलं, आपल्या नवऱ्यानेच पुन्हा जन्म घेतला आहे; म्हणून तिने नवीन पद्धतीचं नाव ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या विरोधाला न जुमानता त्याचं नाव ‘साबाजी’च ठेवलं; पण मग तिला प्रश्न पडला की, नातवाला नवऱ्याचं नाव ठेवलं खरं, पण त्याला त्या नावाने हाक कशी मारायची? म्हणून तिने त्याच्या नावातला ‘सा’ बाजूला काढला आणि त्याला फक्त ‘बाजी’ म्हणू लागली. मग तिने ठेवलेलं हे टोपणनावच सगळ्यांच्या तोंडी झालं.
बाजीचा आजा एक साधा सरळ माणूस होता. त्या उलट बाजीचा स्वभाव होता. त्याचं बोलणं तिरकस, कुजकट आणि फटकळ होतं. बाजी गावच्याच हायस्कूलमध्ये ‘दहावी नापास’ या पदवीपर्यंत शिकलेला होता. ‘धावी पास झालंस तर तुका मुंबैक धाडीन’ असं त्याच्या बापाने म्हणजे शीतारामाने त्याला सांगितलं होतं; पण दहावी नापास झाल्याने आणि पुन्हा परीक्षेला बसण्याची त्याची इच्छा नसल्याने त्याची मुंबैची संधी हुकली होती. त्याच्या मित्रांनी तसंच वाडीतल्या काही वडीलधाऱ्यांनी त्याला पुन्हा परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला. पाच वेळा बसून धावी पास झालेल्या आणि पुढे पदवीधर होऊन हायस्कूलमध्ये शिक्षक झालेल्या गावातल्या जनार्दन गुरवाचं उदाहरणही समोर ठेवलं, प पण बाजीने मानलं नाही. त्याचं म्हणणं असं की, “मी बसलंय तेवाच बोर्डान माका पास करूक व्ह्या हता. पन नाय केल्यान पुन्ना बसान त्येच्या फुडे ह्यो बाजी हाजी हाजी करूचो नाय. माका। आणि असं सांगताना आपण पन मानपर्तिष्टा आसा की नाय?” बोर्डाची कशी जिरवली असे मगरूर बोड भाव त्याच्या चेहन्यावर हन्यावर स्पष्ट दिसायचे.
Story of Soragat in Marathi
गेली दोन-तीन वर्षे सांगूनसवरूनही उंडगेगिरी आणि चमकोगिरीव्यतिरिक्त बाजी काहीही करीत नाही, असं दिसल्यावर शीतारामाने मनात काही गोष्टी येवजल्या आणि एके दिवशी तो आपला मित्र आणि गेली पंधरा वर्षे गावचा सरपंच असलेला भाऊ याच्या घरी त्याला घेऊन गेला.
“ये शीताराम, ये.” भाऊंनी त्यांचं स्वागत केलं.
“बसा.”
“कसा काय चल्लाहा तुझा भाऊ?” शीतारामने विचारलं.
“तुमचे सगळ्यांचे कृपेन अगदी येव्वसतीत चल्लाहा.’
“परया पेपरात इल्ललो पालकमंत्र्यांबरोबरचो तुझो फोटू माका कोनी तरी दाखवल्यानं.”
“होय होय.” आरामखुर्चीत व्यवस्थित बसत भाऊ हणाले, “मी भेट घितलंय तेंची. गावाच्यो समश्श्या तेंच्या कानावर घातलंय. म्हतला निधी लवकरात लवकर देवची
येवस्ता करा.”
‘होय होय भाऊ, खराच ता. हाली म्हागाय किती वाढलीहा.”
“काय बोलतंहस तू ह्या, शीतारामा ? मेल्या, निधी काय मी माझ्या घरखर्चासाठी मागलंय? गावच्या इकासासाठी मागलंय. रस्ते खराब झालेहत. मधले वाडीतलो साकव कोसळाक झालोहा. तीन नंबर शाळेचा छप्पर पड़ाक झाला हा. समश्श्या काय थोड्यो आसत? ता मरो, तुका तेतुरला काय कळाचा नाय… कित्या येना झाला तुझा? काय कामबिम हुता काय ? कारन सदिच्च्या भेटीसाठी येनाऱ्यांपैकी तू नाय.”
also read : Story of Hanuman sitting on a horse
“खराच ता.” शीताराम म्हणाला, “काय आसा भाऊ, जश्यो गावच्यो समश्श्या आसत तशी माझी पन येक तुमका समश्श्या आसा.” घरची सम
“ती रे क कसली?” भाऊंनी विचारलं.
‘ह्यो माझो झील, बाजी.” बाजीच्या खांद्यावर हात ठेवीत ‘ह्यो माझो त्याने सांगितलं.
“वळाकतंय मी तेक तेका, बघूचो तेवा गावातल्या टग्यांबरोबर उंडगत आसता. काय कामधंदो करीत नाय असा दिसता.”
“नाय ना! म्हनानच तेका तुझ्या पायावर घालूसाठी घेऊन इलहंय.” मग तो बाजीला म्हणाला, “पाया पड रे.”
बाजी उठला आणि भाऊंच्या पायांना हात लावून नमस्कार केला.
“औक्ष्यवंत व्हो.”
“तुझा मोठ्या मोठ्या लोकांबरोबर उठना बसना आसता. बाकीच्यांच्यो वळखी उपयोग नाय.” वळखी आनि म्हशीच्या बुळखीसारख्यो काय उपयोग नाय.”
“किती शिकलंहस रे?” भाऊंनी बाजीला विचारलं.
“येसयेसशीपर्यात.”
“पर्यात म्हंजे पास काय नापास ?”
“नापास.”
“मगे हरकत नाय. पास आसतंस तर पंच्यायत झाली आसती.”
“आसा नोकरी हेचे लायक?” शीतारामाने उत्सुकतेने विचारलं.
“आसा. आमच्या हापिसात हरी सापळ्याचो झील काम करी ठाव्क आसा ना तुका ?”
“होय होय. तीन-चार वर्सा हुतो नाय तो?”
“होय.” भाऊ म्हणाले, “तो नोकरी सोडून गेलो.”
“कित्या रे भाऊ सोडल्यात सोन्यासारखी नोकरी?”
“तेचा लगीन झाला.”
“ठाव्क आसा. पन लगीन झाला तरी नोकरी सोडल्यान ? करतंलो काय तर?’
“अरे, घसघशीत लाटरी लागल्यावर नोकरी कित्या व्हयी?”
“लाटरी लागली?”
“नाय रे, लाटरी म्हंजे तो घरजावय होवून परुळ्याक गेलो. सासऱ्याचा घरदार आसा, प्रापरटी आसा, भुसारी दुकान आसा ता तो संभाळतंलो.”
“बरा झाला.” शीताराम म्हणाला. “होय. सगळा आयता गावला.”
“तेच्याबद्दल नाय म्हनत मी. तो नोकरी सोडून गेलोता बरा झाला म्हंतय. आता आता बाजीक नोकरी गावात.”
“होय. पन तेना काम मन लावून करूक व्हह्या.”
“करीत करीत. करशीत ना रे?” त्याने बाजीला विचारलं
“करीन.” बाजीने खात्री दिली.
“मगे आता घराक जावचे आधी क्यास कापून घी. मगे कनकवलेक जावून फोटू काढून घी. अर्जाबरोबर जोडूचो लागतंलो.”
“क्यास कनकवलेकच कापतंय मी.” बाजीने सांगितलं. “गावातल्या न्हावयाकडे नाय कापीत तूं?” आश्चर्य
वाटून भाऊंनी विचारलं. “छा!” शीताराम म्हणाला, “तेका सलूनच लागता क्यास कापूसाठी. बसाक खुर्ची, पाठीफुडे आरशे…”
“काय हे ह्या उंडग्यांचे नखरे!” भाऊ म्हणाले, “किती घेतत रे सलूनवाले?”
also read : Story of Hanuman sitting on a horse
“आर्डिनरी कापले तर चाळीस रुपये. इस्टाईल व्हयी आसात ही माझ्यासारखी तर शंभर-सवाशेपासून फुडे.”
“क्यास कापूचे सवाशे, येस्टीचे चाळीस-पन्नास, थय
काय खालासपियालास तर पन्नास-साठ रुपये म्हंजे अडीजशे- तीनशे झाले. आनि कमाय काय रे तुझी ?”
“हौस आसता, काकानू!” खाली मान घालीत बाजी म्हणाला.
“मेल्यानू, आधी चार पैशे कमवा मगे हौस करा. बापाशीच्या जिवावर कसली करतास? बरा, हेचे फुडे इस्टायल बिस्टायल चलाची नाय. येवस्तित – हवायचा सरकारी कर्मचाऱ्यासारखा, नाक्यावरच्या मवाल्यांसारख्या नाय. समजला?”
“होय काकानू.’
“ही संधी सोडलंस तर पच्चात्ताप करूची येळ यैत इतक्या लक्षात ठेव. पुन्ना दारात उभो करूचंय नाय.”
“होय काकानू.” बाजी म्हणाला, “मी नोकरी येवस्तित करीन.”
“बरा. ये सोमवारी हापीसात.”
शीताराम खूश झाला. म्हणाला, “बाजी, पाया पड काकाच्या.”
हवांदे रे, मघाशी पडलो ना?”
“पुन्ना पडलो म्हनान काय झाला? काय कंबार मोडतंली हा?”
बाजी पुन्हा पाया पडला. या वेळी जरा व्यवस्थित पाय धरून आणि ते हात आपल्या मस्तकाला पुनःपुन्हा लावीत.
“लय उपकार झाले तुझे भाऊ.”
“आसांदे रे. आपल्या मान्साक मदत करूक नुको ?”
“ता तुझा मोठेपान,” असं बोलून शीतारामाने भाऊंचा निरोप घेतला.”
भाऊंनी त्याला ग्रामपंचायत कार्यालयात घेतलं. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्या हाताखाली तो काम करू लागला. लोक आपली कामं करून घेण्यासाठी आधी बाजीला भेटू लागले. तोही त्यांची कामे करून देऊ लागला. आपल्या खेपा वाचल्यामुळे ते स्वखुशीने धा-वीस रुपये त्याच्या हातावर ठेवू लागले. आपलं महत्त्व आता वाढलेलं आहे, हे लक्षात आल्यावर त्याचा रुबाब, ताठा, अरेरावी अधिकच वाढली. त्याच्या दोन- तीन मित्रांच्या बाइक होत्या. मग त्यानेसुद्धा बाइक घेतली. इतकंच नव्हे तर गावातल्या डॉक्टरची, हायस्कुलातल्या दोन- तीन शिक्षकांच्या गाड्या आहेत तशी आपणही एक सेकंडहॅण्ड गाडी घ्यावी, असं स्वप्नसुद्धा तो पाहू लागला. कदाचित त्याने घेतलीही असती पण सरपंचानेसुद्धा ती अजून घेतलेली नसल्याने त्याची नैतिक अडचण झाली.
आता त्याची ‘सर्व्हिस’ सात-आठ वर्षे झाली होती. दरम्यान त्याच्या बापाने वरची वाट धरली होती. आता घरात तो आणि त्याची आई दोघंच होती.
गेल्या पंधरवड्यात त्याच्याबरोबरच्या दोन मित्रांची लग्नं झाली होती. त्यांच्या जेवणावळी तो जेवून आला होता; पण एका लग्नातले गुलाबजाम आणि दुसऱ्या लग्नातल्या जिलब्या काही त्याला गोड लागल्या नव्हत्या. वर्षातून साताठ महिने सेंटरिंगची कामं करणाऱ्यांची लग्नं झाली आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरी असूनही आपण अजून सडेफटिंग आहोत. रात्री आपले मित्र मजा मारीत असताना आपण मात्र उपडे झोपत आहोत, ही बाब त्याला सलू लागली. तो अस्वस्थ होऊ लागला. त्याचं कामावर लक्ष लागेना, अन्न गोड लागेना. एवढंच कायआपण आज काय जेवलो तेही त्याला आठवेना.
also read : Story of Hanuman sitting on a horse
एके दिवशी संध्याकाळी कामावरून आल्यावर तो आपल्या आईला म्हणाला,
“आये!”
“काय रे?” आईने विचारलं.
“उद्या तुझा काय काम नाय हा ना?” “नाय बाबा, काम कसला आसतंला?”
“होय ना, मगे उद्या कनकवलेक जावून तुझे कान आणि
डोळे तपासून घेवया.” “कित्या?” आईने आश्चर्य वाटून विचारलं. “माझ्या काना-डोळ्यांका काय झाला हा ?”
“तुझी नजार कमी झाली आसात तर तपासूया. ह्या वयात
मोतिबिंदू वाढता म्हंतत. साठ-वर्षांचे नंतर कानांची पन ग्यारंटी नसता.” बाजीने सांगितलं. “नाय बाबा, माझी नजार बरी आसा आजून. मी तांदूळ
निवडतंय, सुयीत दोरो ओवतंय. कान पन धड आसत माझे.
झाडाचा पान पडला तरी आय्काक येता माका.” “कान-डोळे इतके चांगले आसत तुझे?”
“तर रे! वगीच खर्च कित्या तपासूचो. त्या मेल्या डाक्टरांची धन.”
“कान- नजार चांगल आसा तर माझ्याबरोबरच्यांची लग्ना झाली ती तुका कशी दिसली नाय. कानावर पन पडली नाय ? माझ्या लग्नाचा बघित कित्या नाय तू आजून ?”
बाजीच्या आईला असल्या त्याच्या बोलण्याचा राग आला.
ती म्हणाली, “तुझ्या लग्नाचा बघित नाय म्हनान माझे कान, डोळे फोडूक उठलंस तूं? मी मुद्दमच कानोडोळो करतंहय.”
“मुद्दम ? कित्या?”
“मी सांगलंली खंयची गोष्ट करतंहंस तू? काय करूचा झाला तर माका इचारतंहस ? आपल्या मनाक यैत ताच करतंस ना ? मी केल्लला काय तुझ्या मनाक येताहा ? मगे लगीन माझ्या सांगन्यान करतंलंस?”
आईच्या या पवित्र्याने तो थोडा हादरला होता. तो काही बोलला नाही. ते पाहून ती म्हणाली, ‘व्हया तर माडाबुडल्या आपांका नि सावत्मामांका सांगतंय तुझ्यासाठी सोरगत बघूक. वडीलधारे आसत ते.”
“तेंची लाकडा गेली मसनात. ते कसला माझा लगीन जमवतंले ? माझा मीच बघीन.”
“ता लय बरा!” आई फणकाऱ्याने म्हणाली.
“असा कित्या म्हंतस?”
“तुझो सोभाव माका ठाव्क आसा. आव्स आसय मी
तुझी.”
“हरकत नाय.” बाजी म्हणाला.
बाजीच्या आईला हलकं वाटलं. ती मनात म्हणाली, ‘ह्येचा लगीन कोन जमईत. मुलगी चांगली नाय मेळाली तर ता सगळा खापार जमवनाऱ्याच्या टकल्यार फोडीत.’
त्यानंतर आठ-दहा दिवसांनी बाजी आईला म्हणाला,
“आये, मी उद्या येक मुलगी बघूक जातंहय.”
“जा. पन येका-दोघा जानत्यांका घेवून जा.” आईने सल्ला दिला.
“जानते कित्या व्हये?” तो मगरूरीने म्हणाला. “आजकालच्या मुलींच्या कपड्यातला, फॅशनीतला, शिक्षनातला तेंका काय कळतंला?”
“तर काय येकटोच जातंलंस?”
“नाय. नारग्याक बरोबर न्हेतलंय.”
“जा. तुझी मर्जी.” ती म्हणाली. “पन मुलगी खंयच्या गावची आसा ? आणि कोनाची ?”
“ती तुका आता अॅडवान्स कित्या व्हया? मी मुलगी बघतंय. पसन पडली तर तुका सगळा सांगान. अगदी डिटेलमधी. आता सांगत बसलंय तर तुझो नि माझो येळ वगीच फुकट जातंलो.” यावर बिचारी म्हातारी काही बोलली नाही.
मग तो थोडा वेळ थांबला. विचार केल्यासारखं करून विचारलं,
“बरी आठवन झाली. आये, याक इच्यारू?י
“इच्यार. इच्यारूक परवानकी कधीपासून लागाक लागली तुका ?”
“तसा नाय. मुद्दो कळीचो आसा म्हनान अगाव परवानकी व्हयी.”
“कळीचो मुद्दो?” तिने कपाळाला आठ्या घातल्या. “बरा इच्यार.”
“उद्या सुनेक नांदवशीत ना येवस्तित?”
“म्हंजे? म्हनाचा काय हा तुका ?”
“गे लोकाच्या सोन्यासारख्या चेडवाक वगीच सासुरवास नको.”
“सोन्यासारखी ! आधी आन तरी कोन ती अपसरा घरात!”
” तसा नाय. उद्या घरात म्हाभारत नुको.”
“मी म्हाभारत करतंलंय?”
“काय सांगता यैत काय? आजी मरापर्यात तिच्याबरोबर उभो दावो धरलंस !”
“सासयेबरोबर भांडलंय म्हनान सुनेबरोबर भांडान?”
“ताच इच्यारतंहय मी. बाकी काय नाय आये, गावातले तंटामुक्ती समितीचो पन सभासदं आसय मी. म्हनान कनफर्म करून घेतंय. काय ता स्पष्ट सांगशीत तर बरा.”
तिने रागाने बाजीकडे पाहिलं आणि तिथून जाताजाता म्हणाली,
“मी सुरवात करुचंय नाय.”
आईने आपल्याच कोर्टात चेंडू टाकल्याने बाजी थोडा काळजीत पडला.
मुलगी पंचक्रोशीतलीच होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास बाजी आणि नारग्या बाइकवरून मुलीच्या घरी आले. मुलीच्या वडलांनी त्यांचं स्वागत केलं. ओटीवर साताठ खुर्चा मांडून ठेवलेल्या होत्या. वेगवेगळ्या रंगांच्या आणि डिझाइनच्या – त्या प्लास्टिकच्या खुर्चा आजूबाजूच्या घरांतून आणलेल्या दिसत होत्या.
“येवा. बसा.” यजमानाने सांगितलं. दोघेही बसले.
“तुमी दोघजानच इलास, जानते कोन नाय येव्क?” यजमानाने विचारलं.
“आमी पन जानतेच आसव. वयाची येकवीस वर्सा झाली तेका आता साताठ वर्सा झाली.” बाजीने उत्तर दिलं.
यजमान खजील झाला. केविलवाणा हसला. म्हणाला, “जानते म्हंजे वडीलधारे असा माका म्हनाचा हुता.”
“आमचे वाडीत वडीलधारे दोघजानच आसत. त्यांना आनायचा म्हंजे येक आंबुलन्स घेवून येव्ची लागली आसती. हिंडतफिरत नाय ते आता. वरचे तिकटीची वाट बघतंहत. तिकीट इला काय आमी तेंची तिरडी बांधाक घेतंलंव.”
असलं बोलणं ऐकून यजमान हादरला. अशा माणसाबरोबर काय बोलावं त्याला कळेना. तो गोंधळून गेला. एवढ्यात बाजीने त्याला विचारलं,
“आज तुमच्या गावात टॅन्कर येव्क नायसो वाटता.” “टॅन्कर कित्या व्हयो ? आमचे बावडेक बारा म्हैने पानी आसता. आमी पंप पन बसवलंलो हा.” यजमान्याने अभिमानाने सांगितलं.
also read : Story of Hanuman sitting on a horse
“इल्लल्या पावन्यांका आजून पानी पन आनून दिलास नाय म्हनान इच्यारलंय.”
यजमान्याने जीभ चावली. म्हणाला,
“माफी करा हां.” बाजीच्या बोलण्याने यजमानी इतका भेदरला होता की, गृहस्थाश्रमीचा साधा शिष्टाचारही विसरला होता. “आता आनतंय,” असं म्हणून तो आत गेला आणि तांब्यापेला घेऊन आला.
पाणी पिऊन झाल्यावर बाजी म्हणाला,
“आता इल्ल्या कामाक सुरवात करू या नाय?”
“वाय्च पाच मिन्टा थांबा. आमचे वडीलधारे येवचे आसत. आमचे चुलतभाव आसत ते त्या फुडल्या घरातले.”
“हिंडते फिरते आसत ना? येवंदे येवंदे.”
एवढ्यात साठीच्या आसपासचे दोघे जण आले. आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करून बसले.
यजमानाने आलेल्या पाहुण्यांची आणि आपल्या भाऊबंदांची ओळख करून दिली. त्यानंतर आणखी दोघेतिघे येऊन बसले. घरातसुद्धा मागच्या दाराने शेजारपाजारच्या बायका आल्या होत्या. वळईच्या खिडकीतून बाजीला पाहण्यासाठी रांग लावल्याचं दिसत होतं.
एवढ्यात यजमान्याने बाजीला विचारलं,
“आता मुलीक बोलावूक हरकत नाय ना?”
“खंय गेलीहा ?” बाजीने विचारलं.
“खंय जाव्क नायहा, घरातच आसा. भाग्र बोलाव्या.”
“बोलवा बोलवा. बघुसाठीच इलंहव.”
यजमान्याने वळईच्या दारातून मुलीला सांगितलं,
“ये चेडवा, ये.”
मुलगी आली. सर्वांना नमस्कार करून मान खाली घालून उभी राहिली. ते पाहून बाजी यजमान्याला म्हणाला,
“मुलीक वाय्च सरळ बघूक सांगा, मगे नाक, त्वाँड, डोळे आसत की नाय ता दिसात. निसतोच गजरो दिसताहा.”
सगळे हसले.
मुलीने वर पाहिलं. मुलगी दिसायला बरी होती. तीसुद्धा बाजीला पाहण्याचा प्रयत्न करीत होती.
“मुलीक काय इच्यारूचा आसात तर इच्यारा, मगे तेका बोलाक येता की नाय ता पन कळात.” एका जाणत्याने हसत बाजीला सांगितलं.
“होय होय. ता पन बरोबर.” बाजी म्हणाला आणि विचारलं,
“नाव काय तुमचा ?”
“शांता.”
“असा रासन कार्डावर आसता तसा अर्धवट नाय, आधारकार्डावर आसता तसा पूर्न नाव सांगायचा.” बाजीने सांगितलं.
“शांता नामदेव गावडे.”
“शिक्षन किती काय?”
“धावीत आसतंना शाळा सोडूची लागली.”
“असा ? कित्या?”
“आयेच्या बाळंतपानासाठी.”
यावर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. दारात उभी असलेली तिची आई आणि बैठकीत बसलेला बापसुद्धा ओशाळला.
“चांगली गोष्ट आसा.” बाजी म्हणाला, “भावंडा किती तुमी ?”
“पाच.” पंजा दाखवीत शांताने सांगितलं. “मी मोठी.”
“तेवाच बाळंतपनाची जबाबदारी येवून पडली. बरा फुडे…”
“फुडे काय नाय. आयेन आपरेसन करून घितल्यानं.”
“ता यौग्यच केल्यान. बेरजेचा गणित राजकारनात चालता, संसारात नाय. पन माका असा इच्यारूचा हुता की, फुडे मगे तुमका वाटला नाय अर्धवट -हवंलला शिक्षन पुरा करूचा असा ?’
“नाय.”
“कित्या?”
“माझा गणित आनि इंग्रजी कच्चा हुता. परीक्षेक बसान काय उपयोग नाय हुतो.”
“होय ना, ता बरा केलास. नाय तर आमी हात दाखवून अवलक्षान करून घितलंव.”
“म्हंजे तुमी…” पण मुलीचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच बाजी म्हणाला, “नॉन मॅट्रिक. म्हनान तर ही गवरमेंटची नोकरी मेळाली. माझ्याबरोबरचे पास झाले ते कोन प्रायवेटमधी तर कोन कॉन्ट्रॅक्टवर कामा करतंहत. उद्या तेंका नाय संर्विस मेळतंला ना पेंडसन.”
“होय होय.” एक जाणता म्हणाला, “आजकल शिक्षनाक काय किंमत -हवली नाय.” यावर बाजी म्हणाला,
“आमचे पंचायतीचे लायब्रीत याक पुस्तक आसा. तेचा नाव आसा ‘नापास मुलांची गोष्ट.’ नापास झाल्लली मान्सा फुडे कशी मोठी झाली. कसो नावलौकिक कमावल्यांनी तेच्यावर लिवलंला हा. अगदी इंदिरा गांधीसारख्यांची पन तेच्यात म्हायती आसा.”
“तेच्यात तुमचा पन नाव….” एक जण बाजीला विचारू
लागला; पण त्याला वाक्य पूर्ण करू न देता बाजी म्हणाला, “नाय नाय. तेच्यात माझा नाव नाय. तेचा काय झाला, तो लेखक माझ्याकडे येवसाठी भायर पडलंलो, पन कनकवलेपर्यात पोचाकच नाय. फोंडाघाटातच तेची गाडी बिघाडली. तो थयसूनच परत गेलो.”
“गाडी बिघाडली तर परत कसो गेलो?” एकाने विचारलं. हा प्रश्न बाजीला आवडला नाही. तो म्हणाला, “तेना हेलिकाप्टर मागवल्यान. तो हेलिकाप्टरात बसलो
नि गाडी चाकांका लटकवून मुंबैक घेवून गेलो.” “बरा, आनकी काय इच्यारूचा आसा मुलीक? बरोच
येळ उभी आसा.” एक वडीलधारा गाडी हेलिकॉप्टरकडून मुद्द्याकडे वळवीत म्हणाला.
“होय होय.” बाजी म्हणाला, “तिका बसवूक व्हाया हुता. येक खुर्ची कमी पडली.”
बाजीला तिचं नाव आवडलं होतं. ते घेऊन तिला पुढचा प्रश्न विचारावा असं त्याला वाटत होतं. त्यातला हळुवार थरार त्याला अनुभवायचा होता; पण नुकतीच ओळख झालेल्या मुलीला एकेरी नावाने हाक कशी मारावी, असा प्रश्न त्याला पडला म्हणून आदरार्थी नाव घेत त्याने विचारलं,
“शांताबाई….”
“शांताबाय म्हना नुको !” अकस्मात चिडून, चवताळून ती ओरडली. डोळे गरगरा फिरवीत दात-ओठ चावून थरथर कापू लागली. या अनपेक्षित प्रकाराने सगळेच हादरले.
“केलास सत्यानास?” दोन्ही हातांनी आपलं डोकं धरून तिचा बाप म्हणाला.
“काय झाला?” गोंधळून गेलेल्या बाजीने विचारलं. “अवो, काय सांगाव तुमका ! ता शांतबाय गाना इल्यापासून गेला वरीसभर ह्या असा करता. ह्या दिसला काय वाडीतली पोराटोरा ह्या गाना म्हनान तेका चिडवतंत. मगे ह्या असा चवताळता. तेंचे पाठी लागता. तेका थारवून मान्सात आनीपर्यात आमच्या नाकात नव येतंत.”
“असा हा ?”
“हो वो. म्हनान ता आमचे पाठी लागलाहा. माझा नाव बदला, माझा नाव बदला म्हनान.”
“खराच की काय ?”
“तर वो!” बाप म्हणाला.
“आता हिचा नाव बदलायचा म्हंजे पुन्ना खर्च.” बाजी बोलू लागला. “खर्च तो खर्च आणि हिका पाळन्यात घालूचा झाला तर इतक्या मोठा पाळना खयसून आनतंलास? आणि ‘कुनी गोविंद घ्या कुनी गोपाळ घ्या’ असा म्हनान जोजवूक आनि कानात नाव सांगाक हिच्या आत्याक तरी कसा जमतंला ? ती झाली आसात आता म्हातारी.”
“नाय नाय.” घाईघाईने शांताचा बाप म्हणाला.
“नाय नाय काय ?”
“म्हातारी नाय. हिची आत्या म्हंजे माझी भैन हिच्यापेक्षा
दोन वर्षांनी मोठी आसा. गेल्या वर्साच तिचा लगीन झाला.” “काय सांगतास काय?” आश्चर्य वाटून बाजीने विचारलं.
“होय होय.” एक वडीलधारे बोलण्यात भाग घेत म्हणाले, “ह्या घरची सून आपले साययेची येकदोन बाळतपाना काढता अशीच ह्या घरान्याची परंपरा आसा.”
ऐकून बाजी मुलीच्या बापाला म्हणाला,
“म्हंजे तुमचे वडील बरीच वर्सा कार्यरत हुते म्हनाक व्हये.”
“कार्यरत म्हना कार्यकक्षम म्हना हुते ह्या खरा.”
“म्हंजे तुमच्या ह्या चेडवाचो पुन्ना बारसो केलास तर ती तिका उचलून घेय्त म्हंतास?”
“घेय्त. पन बारशाचा नाय जमाचा.” “अवो, पन नाव बदलूक सांगताहा ना तुमची लेक?”
“होय. म्हनानच तिचा लगीन करूचा आसा. मगे येकाच धोंड्यात दोन पक्शी मरतीत. पोरगी पन उजवून टाकूक होय्त आनि तिची नाव बदलूची इच्छापन पुरी होय्त.”
“ह्या बाकी खरा.”
“बरा. तिका जावंदे आता?” मुलीच्या बापाने विचारलं.
“थारावली ती?” बाजीने विचारलं.
“होय होय. थारावली, सावारली. येकदम नार्मल झाली.”
“होय ना? मगे येक शेवटचो प्रश्न इचारतंय.”
“इच्यारा.”
मग शांताकडे पाहात बाजीने विचारलं, “जेवानबिवान करूक येता तुमका ? रांदपाचे होवरेत
जाना येना आसता कधी?”
“तर वो !” तिच्याऐवजी तिचा बाप म्हणाला, “डाळभात, पिठीभात, कोंबड्याची सागोती, घावने, पोळ्यो, भाको, वडे, फोये, उपमो ह्या सगळा….”
“येका दमात म्हनान दाखवता?” बापाचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच बाजीने विचारलं.
“म्हनान दाखईत नाय. हे सगळे पदार्थ करता ता.” “व्वा! म्हंजे सुगरनच आसा म्हनाक व्हयी.”
“होय होय. सगळा शिकवल्यानत हा तेका तेचे आवशीन
अगदी पाचये यत्तेत आसल्यापासून.”
“शिकवना ही काळाची गरजच हुती. नाय तर तिच्या बाळतपानात ह्या सगळा कोनी केल्यान आसता?”
“ता पन खराच पावन्यानू.” बाप म्हणाला. तिच्या बाळतपानात माझी भैन भायरची म्हंजे शेतीवाडीची कामा संभाळी आनि ह्या घरातला पानीउदाक, जेवान करी. तेच्यात सगळे गून आसत. नाव ठेव्क जागो नाय हा.”
also read : Story of Hanuman sitting on a horse
“जागो नसलो तरी तेका ता नाव आवडत नाय म्हतल्यावर
दुसरा ठेवचाच लागतंला ना?” “ता झालाच!’
दिली. “बरा, जांवदे तिका आता घरात.” बाजीने परवानगी
“जा चेडवा जा. चायपानी घेवून ये.” बापाने सांगितलं. “च्याय दुधाची आसा ना? काल येकठय गेलंय तर फुटी च्याय दिल्यानी.”
“नाय नाय. आमच्याथंय दुधाचीच चाय आसता. दूध आमका इकत घेवचा लागत नाय. घरातले म्हशींचाच दूध आसा आमच्या थय.”
“घरातले म्हशींचा?”
“घरातले म्हशींचा म्हंजे घरच्या म्हशींचा. तीन म्हशी आसत आमच्यो.”
“आसो आसो. म्हशी आसल्यो मगे घरदार भरलंला दिसता. आमच्याथय आमी दोघाच. आये आनि मी.”
यावर काय बोलावं तिथे बसलेल्या कुणालाच कळेना. बाजी मात्र गालातल्या गालात जीभ घोळवून हसत होता.
चहापाणी झालं.
उठता उठता बाजीने सर्वांना नमस्कार केला आणि म्हणाला,
“बरा, चलतंव आमी. येकदोन दिवसांत आमचो निरनय कळवतंय.”
“बरा.” मुलीचा बाप म्हणाला.
ते निघाले.
“बाजी, मुलगी आवाडली तुका?” नारग्याने विचारलं. “न आवाडन्यासारख्या काय आसा तिच्यात ? सगळा जयचेथय आसा.”
“म्हंजे हिका तू पास केलंस म्हनाक व्हयी.”
“नाय. पास असली तरी नकार कळवतंलंय.”
“कित्या?” आश्चर्य वाटून नारग्याने विचारलं. “कारण तुका बरोबर घेवून इलंय ती माझी घोडचूक झाली.” बाजी म्हणाला, “मी येकट्यानच येव्क व्हया हुता.”
“अस कित्या म्हंतस ? मी काय केलंय?” काही न कळलेल्या नारग्याने विचारलं.
बाजीने गाडी थांबवली आणि नारग्याला म्हणाला, “तिका शांताबाय म्हनान चिडवतंत आणि ती चिडता, चवताळता ह्या सगळा तुका कळला… आता तुझ्या तोंडात हवाचा नाय. कारन तुझ्या तोंडात तीळ पन भिजत नाय. तू ह्या कोनाक तरी बोलतंलंस आनि ता गावभर होतंला. लगीन करून इल्यावर प्वॉर तिका ‘शांताबाय’ म्हनान चिडवतंले. मगे मघाशी झालो तोच पर्कार होतंलो. तेव्हा नुकोच ती सोरगत. तुझ्यामुळा येक चांगली मुलगी सोडून देवची लागतंली. आता मी ठरवलंहय हेचेफुडे येकट्यानच मुलगी बघूक जायाचा.”
“ह्या तुझा फायनल ?” नारग्याने विचारलं.
“अगदी फायनल.”
“बरा. तू आता कायव ठरव पन इतके मित्र आसतंना तू माका मुलगी बघूसाठी घेवून जावचो जो मान दिलंस तेच्याबद्दल तुझे आभार मानुकच व्हये.”
“तुकाच बरोबर न्हेव्क कारन हुता. रूपालक्षनान मी तुझ्यापेक्षा शंभरपटीनं बरो आसय. त्यामुळा न्हवऱ्यामुलापेक्षा तेचो मित्र बरो दिसता असा म्हनाची कोनाची प्राज्ञा नाय हुती.”